“आमची फिरत नाही खोपडी म्हणून तुटते आमची झोपडी,
जर फिरली आमची खोपडी तर तुटू देणार नाही आमची झोपडी”
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
आठवले यांचा बांद्रा येथील मोर्चात सरकारला इशारा
राज्यभर रिपाइंचे भूमीमुक्ती आंदोलन
मुंबई दि. 20 - झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी ;झोपडिवासीयांच्या न्याय हक्कासाठी आरपीआय संघर्ष करीत राहील. सन 2014 पर्यंत च्या झोपड्यांना अधिकृत करण्यात यावे. कोणत्याही प्रकल्पात बाधित होणार्या झोपड्यांचे आधी पुनर्वसन केल्या शिवाय गरिबांच्या झोपड्यांना हात लावाल तर याद राखा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज बांद्रा येथे मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर आयोजित झोपडपट्टीवासीयांच्या मोर्चात राज्य सरकारला दिला.
“आमची फिरत नाही खोपडी म्हणून तुटते आमची झोपडी, जर फिरली आमची खोपडी तर तुटू देणार नाही आमची झोपडी” अशी कविता सादर करीत झोपडीवासीयांनी आपल्या निवार्याच्या हक्कासाठी राज्य सरकार विरुद्ध आक्रमक संघर्षशील होण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकार च्या रेल्वे;बीपीटी; संरक्षण मंत्रालय आदी जमिनींवरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी या जमिनी केंद्र सरकार कडून राज्य सरकार ने खरेदी करून त्या जमिनींवर एस आर ए योजना राबवून तेथिल झोपडीवासीयांचे पुनर्वसन केले पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे ना.. रामदास आठवले म्हणाले.
राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयांवर रिपाइं ( आठवले) यांच्या वतीने भूमीमुक्ती आंदोलन करण्यात आले.त्यानुसार 2014 च्या झोपड्यांना शासकीय मान्यता देण्यात यावी; भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमीन शेतीसाठी देण्यात यावी; गायरान जमिनीवरील 2014 पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्यात यावे या मागण्यांसाठी ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर रिपाइं तर्फे भूमीमुक्ती आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत आज मुंबईत झोपडपट्टीवासीयांचे रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व ना रामदास आठवले यांनी केले.
यावेळी सौ सीमाताई आठवले उपस्थित होत्या. मुंबईत आंदोलनाचे आयोजन रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;रिपब्लिकन झोपडी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाले; सरचिटणीस रतन अस्वारे यांनी केले.
यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर; माजी आमदार सुमंतराव गायकवाड ; काकासाहेब खांबळकर; सुरेश बारशिंग; लखमेन्द्र खुराणा; पोपटशेठ घनवट; अनिल गांगुर्डे; सौ शिलाताई गांगुर्डे ऍड. आशाताई लांडगे; ऍड. अभयाताई सोनवणे; मुस्ताक बाबा; प्रकाश जाधव; संजय पवार;हरिहर यादव; सिद्धार्थ कासारे; रमेश गायकवाड; उदयराज तोरणे ; मोहन चव्हाण; अमित तांबे; बाळासाहेब वाघमारे; नागेश तांबे; किसन रोकडे। ब्रिजेश आर्या; याकूब खान; भीमराव कांबळे; अर्जून माघाडे; दास दुबटे; निर्मला सिंह; उल्हास साळवी; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.