अॅपद्वारे रक्तदाबाच्या रुग्णांची नोंदणी
दुसर्या टप्प्यात
9 जिल्ह्यांचा समावेश
मधुमेही रुग्णांचीही नोंदणी; वर्ध्यात प्रायोगिक तत्वावर वापर - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 13 : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवरील उपचार व पाठपुरावा करण्यासाठी चार जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणारे ‘सिम्पल’ प आता दुसर्या टप्प्यामध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या नऊ जिल्ह्यात वापरण्यात येणार आहे. या पच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांची देखील नोंद ठेवण्यात येणार असून त्यासंदर्भातला पथदर्शी प्रकल्प वर्धा जिल्ह्यात नुकताच सुरु झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात सध्या भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या पच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी केली जात आहे. बदलत्या जीवनशैलीशी निगडित उच्च रक्तदाबाच्या आजारावर नियंत्रणासाठी ‘इंडिया हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह’ (आयएचसीआय) यांच्या मदतीने हे प तयार करण्यात आले आहे.
रुग्णांची नोंदणी ते त्यांचा पुढील 30 दिवसांपर्यंत पाठपुरावा या पच्या माध्यमातून करण्यात येतो. विशेष म्हणजे या पमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांची रक्तदाबाची तपासणी उपचार मोफत केले जात आहे. त्याचबरोबर त्यांना संपूर्ण महिनाभराच्या गोळ्यादेखील मोफत दिल्या जातात. या पमुळे रक्तदाबाच्या रुग्णांचा पाठपुरावा करणे सोपे झाले आहे. रुग्णाला उपचार सुरु करुन 30 दिवस पूर्ण होताच पुढील पाठपुराव्यासाठी त्याला मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो. एखादा रुग्ण 30 दिवसानंतरही उपचाराला आला नाही तर त्याची यादी केली जाते. ती यादी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ नर्सकडे जाते. त्यावरुन नर्सकडून त्या रुग्णाशी संपर्क केला जातो. रुग्णाकडून प्रतिसाद न मिळाल्यास ती यादी एएनएम, आशा वर्कर यांना दिली जाते. आशा वर्करकडून संबंधित रुग्णाच्या घरी भेट दिली जाते व उपचाराबाबत पाठपुरावा केला जातो.
महाराष्ट्रासह अन्य पाच राज्यांमध्ये या पचा वापर सुरु असून आतापर्यंत भंडारा, वर्धा, सिंधुदुर्ग आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये 1 लाख 27 हजार 882 रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या नऊ जिल्ह्यांमध्ये दुसर्या टप्प्यात ‘सिम्पल’ पचा वापर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केला जाणार आहे. सध्या या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, एएनएम, औषध निर्माता यांचे प्रशिक्षण सुरु आहे. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेहाच्या रुग्णांची नोंदणीदेखील या पवर करण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प वर्धा जिल्ह्यात सुरु झाला आहे, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
उच्च रक्तदाब नियंत्रणाबरोबरच धोकादायक रुग्णांचे निदान करुन त्यांच्यावर पुढील उपचार करणे यामुळे सोपे झाले आहे. उच्च रक्तदाबामुळे निर्माण होणार्या हृदय विकार आणि पक्षघाताच्या आजारावर मात करण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.